शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ वसंत ऋतूमधील प्रखरसूर्यकिरणांनी प्रकुपित झाल्याने अग्निला क्षीण करून अनेक रोग उत्पन्न करतो; म्हणून वसंत ऋतूमध्ये खालील पध्दतीचा आहार विहार ठेवावा.
पथ्य (योग्य)आहार
	- 
	
जूने जव, गहू यांचे पदार्थ
	 
	- 
	
मधाचा वापर वाढवावा
	 
	- 
	
भाजलेले मांस (कोंबडा, बकरा इ.)
	 
	- 
	
पचण्यास हलकी व रूक्ष अन्न खावीत (सातू, साळीच्या लाह्या इ.)
	 
	- 
	
जल-सुंठयुक्त पाणी
	 
	- 
	
मध +साधे पाणी
	 
	- 
	
नागरमोथा सिध्द जल पिण्याकरिता वापरावे.
	 
पथ्य (योग्य)विहार
	- 
	
वमन, नस्य,- पंचकर्म उपक्रम
	 
	- 
	
व्यायाम
	 
	- 
	
कापूर, चंदन, अगरू, केशर इ. तूर्णांनी बनलेले सुगंधि उटणे लावून मर्दन करावे.
	 
	- 
	
धूम्रपान ( औषधी द्रव्यांचे)
	 
	- 
	
कवलधारण (औषधी काढे/ तेले)
	 
	- 
	
अंजन इ. चा वापर करावा.
	 
	- 
	
सकाळच्या (पहाटेच्या) शीतल हवेमध्ये चालणे
	 
अपथ्य (अयोग्य) आहार
	- 
	
पचण्यास जड, आंबट, गोड, स्निग्ध पदार्थांचा वापर करू नये. (उदा. पनीर, चीज, विविध मिठाया, दही इ.)
	 
 
अपथ्य
 
प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे उपचारापेक्षा सदैव श्रेष्ठ आहे